शेतकऱ्यांच्या दु:खद स्थितीचे वर्णन करणारी आणि शासनाला थेट सवाल करणारी एक कविता एका शेतकऱ्याच्या लेकीने मंडळी आहे. “शेतकरी असणं म्हणजे गुन्हा आहे का?” असा कडवट प्रश्न रेश्मा शंभूराज कटके यांनी आपल्या कवितेतून मांडला आहे. शेतकऱ्यांच्या संघर्षमय जीवनाचे आणि शासनाच्या धोरणांतील त्रुटींचे थेट चित्रण करत ही कविता ग्रामीण महाराष्ट्राच्या हृदयाला स्पर्श करत आहे.
कवितेतील शब्द शेतकऱ्यांच्या अडचणींना वाचा फोडतात—निसर्गाचा कोप, अनिश्चित पाऊस, कर्जबाजारीपणा, पीकविम्याच्या तक्रारी, आणि बाजारातील कमकुवत दर. हे सगळं अनुभवताना शेतकऱ्यांना वारंवार असे वाटतं की, त्यांचं शेतकरी असणं हा गुन्हाच आहे का?
“शेतकरी म्हणून का आम्ही नेहमीच दु:खाला कवटाळतो? का आमच्या मेहनतीचं फळ फक्त कर्जाची पाटी देऊनच संपतं?” असे कडवे शेतकऱ्यांच्या मनातील वेदना मांडतात.
शेतकऱ्यांच्या शोषणाबाबत कवितेत संतापही व्यक्त करण्यात आला आहे. या कवितेत अप्रत्यक्ष टीका केली आहे, जिथे तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना अपेक्षित लाभ मिळत नाही.
कवितेने समाजाला विचार करायला भाग पाडलं आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती व्यक्त करत, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारला शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या या व्यथा फक्त कवितेतच नाहीत, तर त्यांच्या रोजच्या जगण्यातही दिसून येतात. “शेतकऱ्यांच्या कष्टांवरच देशाचा पाया उभा आहे, मग त्यांच्यावरच अन्याय का?” या कवितेत व्यक्त झालेला प्रश्न प्रत्येकाच्या मनात सलत आहे.
सरकारने या काव्यात्मक सवालाचा गांभीर्याने विचार करावा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तातडीने सोडवावे, अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे. “शेतकरी असणं म्हणजे गुन्हा नाही; ते देशाचं जीवन आहे,” या संदेशानेच ही कविता संपते.










